यवतमाळ ( प्रतिनिधी) क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महोत्सव समता पर्व प्रति...
यवतमाळ
( प्रतिनिधी)
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महोत्सव समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये यवतमाळ सह विदर्भाच्या सर्व स्तरांमध्ये साजरा केला जातो.यामध्ये वैचारिक पर्वणीचा महत्त्वपूर्ण भाग असतो.विशेषत: नवयुकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशासन या सर्व बाबींचा आढावा सुद्धा या कार्यक्रमांमधुन घेतल्या जाते. गरीब गरजू होतकरू आणि परिस्थितीने अत्यंत हलातीच्या जीवन जगणाऱ्या शेकडो मुला मुलींना डॉ.हर्षदीप कांबळे सर यांनी मदतीचा हात समोर करून त्यांना आपल्या पायावरती उभे केले आहेत. त्यामुळे या वैचारिक पर्वणीच्या महोत्सवात आपण युवा युतीने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यवतमाळ येथील विश्राम भवन येथे संपन्न झालेल्या समता पर्व 2025 च्या युवा सभेला संबोधताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा आचल गोंडाने यांनी केले.
सर्व प्रथम इतिहासकार प्रा.मा.म.देशमुख याना आदरांजलि अर्पण करुन सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अतिथी समतापर्व प्रतिष्ठानच्या मुख्य संयोजिका माधुरी वाळके, प्रवक्त्या एड. सीमा तेलंगे, उपस्थित होत्या. तसेच सभेला ऍड.ज्योती जीवने, शुभांगी मालखेडे, एड. भाग्यश्री खडसे, काजल तायडे, मयुरी मुनेश्वर, वैशाली पवार ,समीक्षा शरलावार, प्रिया कांबळे ,निकिता लढे ,समीक्षा नेवरे, खुशी ठवरे, तनवी खडसे, संजीवनी जाधव, प्राची जोगमोडे, अक्षय कळसकर, अजित कोंद्रे,गणेश शिंदे, नयन मेंढे, महेश सानप, धनराज भोयर, विश्वजीत शेंडे,प्रणय नेवरे, प्रा. नितेश मेश्राम, शाम लता तायडे, पल्लवी भगत, पल्लवी कांबळे ,रीना वानखडे,पायल मनवर इत्यादींची उपस्थिती होती.
No comments