यवतमाळ ( प्रतिनिधी) सर्व समाज घटकांना परिवर्तनाच्या विचारांशी जोडणाऱ्या ऐतिहासिक समतापर्वाची जबाबदारी यावर्षी महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्य...
यवतमाळ
( प्रतिनिधी)
सर्व समाज घटकांना परिवर्तनाच्या विचारांशी जोडणाऱ्या ऐतिहासिक समतापर्वाची जबाबदारी यावर्षी महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे.
या संदर्भाने शासकीय विश्रामगृहावर दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी समतापर्वांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. 2005 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रथमत:यवतमाळ शहरांमध्ये समता पर्वाची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी आयोजन आणि नियोजन समिती स्थापन करून हे समतापर्व यशस्वी करण्यात येत असे. दरम्यानच्या काळात अध्यक्ष, सचिव निर्मितीचा पायंडा निर्माण झाला. महिलांनी या पांयड्याला फाटा देत सुरुवातीच्या आयोजन नियोजन समित्यांची परंपरा पुनर्जीवित केली आहे हे विशेष! यामध्ये आयोजन नियोजन प्रमुख पदी माधुरीताई वाळके, प्रवक्ता पदी ऍड. सीमा तेलंगे, प्रसिद्धी प्रमुख धम्मवती वासनिक यांची एकमताने निवड करण्यात आली.
२०२५ च्या समतापर्व आयोजनासाठी सर्वच समाज समूहातील महिलांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेतला हे २०२५च्या आयोजनाचे वैशिष्ट्य होय. या सभेच्या अध्यक्षस्थानी समतापर्वा २०२४ चे अध्यक्ष मा. इंजि.दीपक नागराळे हे होते. सचिव नारायण थुल यांनी मागील ठरावाचे वाचन केले.
यावेळी ऍड जयसिंग चव्हाण,अनिल रामजी आडे,कवडू नगराळे,उमेश मेश्राम,संजय मानकर,प्रमोदिनी रामटेके, सिदार्थ भवरे,अशोक वानखडे ,ऍड.वैशाली हिरे,ऍड राहुल पाटील, ऍड.सीमा तेलंग,विनोद फुलमाळी, शोभाताई पारधी,सुरज खोब्रागडे मोंटू कोटंबे इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेमध्ये एड. सीमा तेलंग, प्रमोदिनी रामटेके ,जयश्री भगत, रत्नमाला पाटील, पल्लवी कांबळे, माधुरी वाळके, हर्षा बोडके, पल्लवी रामटेके ,प्रांजली राजगडकर, भारती घोडेस्वार, स्वभावना चव्हाण ,सौ नीलिमा सुजित भैसारे, शुभांगी नगराळे, सविता निखाडे ,आशिका निखाडे ,प्रिया वाकडे, रेश्मा कवाडे, सोनाली कवाडे ,लीला आयटे, जिजा भगत, लीला भगत, धम्मावती वासनिक, ललिता हातमोडे, ज्योती तामगाडगे ,माधुरी ढेपे, दुर्गा पटले, मृणालिनी दहीकर ,सुनिता काळे, विना नागदिवे, सुनिता बनसोडे, अर्चना कांबळे ,मंदा निमगडे, मीनल गुंडाणे ,दर्शना वंजारी ,प्रतिभा राऊत, सुलभा कटके, सुनंदा डोंगरे, शुभांगी मालखेडे, ललिता काळे, करुणा चौधरी ,वंदना शिंगाडे, कल्पना ठमके, शोभा कोटंबे, वनमाला वंजारी, जोशना गौरकार, विशाखा डोंगरे ,ज्योती जीवने, ज्योती खोब्रागडे, चंदा उके अर्चना मनोहर ,शितल गणवीर ,तृप्ती गणवीर, रमा गंभीर, सुवर्णा कठाडे, सौ भावने सुशीला नाईक ,ऍड.भाग्यश्री खडसे ,सौ मंजुषा बोरगमवार, निर्मला गायकवाड, विद्या भगत ,कल्पना घनमोडे, स्नेहा डोंगरे, अभ्यंका जीवने ,राधिका सावरकर ,मीना ढोमणे ,लता धोटे, देवांगना मेश्राम ,प्राजक्ता पाटील, लोचना सहारे, शीला फुलमाळी कांचन जुम्नाके, विशाका लिहितकर, प्रगती दातार, उषा उके, भावना चव्हाण इत्यादींची विशेष उपस्थिती होती.
यावेळी संजय मानकर, अनिल आडे, ऍड. रामदास राऊत, शाम आडे,संदीप कोटंबे, सुनीता बनसोड, वनमाला वंजारी, शोभा लाखोरे, जनार्दन मनवर,उमेश मेश्राम, डॉ .चंद्रकांत सरदार ,राहुल कोचे ,विजय वानखेडे ,चंद्रकांत वाळके, अरुण ढबाले, संतोष राऊत, हेमंत कांबळे ,अशोक वानखडे , धर्मपाल भितकर, भीमराव गायकवाड, प्रकाश देवपारे, प्रीतम थूल ,विशाल बजरवरे, राजू चांदेकर ,जितेंद्र ढाणके, विलास वानखेडे, विजय रंगारी ,कविता नामदेव थूल, शंकर पाटील, प्रितेश मुन ,सुरज पाटील, शुभम वाळके, अशोक भोवते ,ऍड.धनंजय मानकर, राजकुमार उमरे, शुभम शेंडे, गंगा रंगारी, डॉ. हिरे, विजय डोंगरे, भिमसिंग चव्हाण ,भावना चव्हाण, सिद्धार्थ मानकर ,रवी श्रीरामे ,धीरज वाणी, विशाल राऊत, भीमराव शिरसाट सह उपस्थित होते. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून आयोजना संदर्भात महिलांमध्ये नवचैतन्य संच्यारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाची थीम राबविणार!
भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाले असेल या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव यावर्षी आपण साजरा करीत आहोत त्यानिमित्ताने भारतीय संविधानाला अनुसरून असणाऱ्या विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व इतर सर्व कार्यक्रम संविधानाच्या या थीम वर राबविण्यात येणार असल्याचे आयोजन नियोजन समिती महिला समता पर्व प्रतिष्ठान यांनी व्यक्त केले.
No comments