Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

देशातील राम मंदिराचा आदर्श घेत अखेर सीता मंदिराचे काम सुरू

  मनोहर बोभाटे  राळेगाव प्रतिनिधी  देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी उत्तर प्रदेश य...

 

मनोहर बोभाटे 
राळेगाव प्रतिनिधी 

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी उत्तर प्रदेश येथून रथयात्रा काढून संपूर्ण देशामध्ये राम यात्रेचे वलय निर्माण केलं होतं. राम मंदिर वही बनायेंगे असा नारा देणाऱ्या या दोघांनी संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यामध्ये ही रथयात्रा नेत प्रत्येक माणसाला हिंदुत्वाची जाण करून दिली आणि जाणीवही करून दिली अशी असताना राम मंदिराची पायाभरणी कधी होणार याबाबतची खलबते संपूर्ण देशामध्ये केली जात होती. त्यावेळी काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा काँग्रेसला कुठल्याही प्रकारची भनक न लागता भरभक्कमपणे राम मंदिराच्या नावावरती एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून संपूर्ण देशांमध्ये एक आदर्श निर्माण केला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता हस्तगत करायची या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न केला त्याचे फलित आज आपणास दिसत आहे. 2014 च्या निवडणुकीपर्यंत राम मंदिराचा मुद्दा उराशी ठेवून प्रत्येक भारतीय माणसाला राम मंदिराच्या नावावरती सक्षमपणे उभा करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी बजरंग दल तसेच इतर सर्व समविचारी संघटनांनी एकत्रित येऊन राम मंदिराचा मुद्दा मोठा केला आणि राम मंदिर अयोध्या या ठिकाणी मोठ्या दिमागदारपणे उभारल्या गेले याचे उद्घाटन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर यावेळी प्रामुख्याने देशातील आणि जगातील असणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी लोकांना बोलावण्यात आले सोबतच इतर धर्मियांच्या धर्मगुरूंना सुद्धा बोलावून राम मंदिराची सक्षमपणे पायाभरणी केली आणि आदर्श निर्माण केला. अयोध्या नगरी ही रामाची नगरी आहे हा ऐतिहासिक पुरावा सुद्धा यावेळी देण्याचे कार्य या सर्व संघटनांनी केले. 
अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये राळेगाव तालुक्यातील रावेरी या ठिकाणी सीतामातेचे दिमागदारपणे मंदिर उभे आहे. हे मंदिर प्राचीन काळातील असून सीतामातेचा वास या ठिकाणी होता अशा प्रकारची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. विशेष म्हणजे ज्यावेळी राम मंदिराचाही मुद्दा ऐरणीवर नव्हता त्यावेळी सिता मातेची पूजा या ठिकाणी सामूहिक रित्या केली जाते.आजही सर्व स्तरात असणाऱ्या भाविकांनी सीतामातेच्या मंदिराला उभारणी देत त्या ठिकाणी आपल्याकडून होईल एवढे प्रयास केले असे असताना आज मात्र सीतामाते च्या  मंदिराचे काम सुरू करण्यात आले आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उइके हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत.त्यांच्याकडे पद आहे असे असतानाही यवतमाळ जिल्हा हा भाजपचा बालेकिल्लाहून ओळखला जाते या ठिकाणी भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहे.  सीतामातेच्या मंदिराची पायाभरणी केली आहे. एकीकडे सीता मंदिराची मागणी जोर धरत होती त्यामुळे भाविकांच्या भावनेचा विचार करून सीता मंदिराच्या या पुनर्बांधणीला अडीच कोटी रुपये देऊन सध्या सुरुवात झाली आहे.
----------
पायाभरणी 
---------------
ऐतिहासिक मंदिराची पायाभरणी करण्यामागचा उद्देश की संपूर्ण देशांमध्ये असणाऱ्या एकमेव सीता मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहावं याकरिताच तीन कोटी तेहतीस लाख रुपये सीता माता मंदिरा करिता व एक कोटी वीस लाख रुपये हनुमान मंदिर पर्यटन करिता देऊन या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा छोटासा प्रयास केलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुख सोयींसाठी अनेक बऱ्याच योजना येथे राबविल्या जाणार आहे त्यामुळे देशातील एकमेव सीता मंदिर म्हणून त्याची ओळख संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये राहील याची खात्री वाटते 
डॉक्टर अशोक उईके 
आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य.

No comments