यवतमाळ जात निहाय जनगणना झालीच पाहिजे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे राष्ट्रीय अध्यक्...
यवतमाळ
जात निहाय जनगणना झालीच पाहिजे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जातनिहाय जनगणना झालीच नाही सर्वप्रथम याचा प्रस्ताव संसदेमध्ये माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांनी मांडला होता. नुकतेच भारत सरकारने जात न्याय जनगणनेचा निर्णय घेतल्याने ओबीसी समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे केंद्र शासनाने या घेतलेल्या भूमिकेबद्दल आज सकाळी स्वागत करण्यात आले.
जोतीबा दीनबंधू कल्याण मंडळाचे अध्यक्ष ॲड.अरुणराव मेत्रे , इंजि. अशोकराव तिखे,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनयना संजय येवतकर ( अजात ) उत्तमराव खंदारे, मनोजभाऊ पाचघरे ,एम के कोडापे, संजय येवतकर, विवेक घावडे ,संदीप कोरडे, अबोली देशमुख, शीतल घावडे, आदींनी संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतीराव फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद उत्सव साजरा करीत केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले.
भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये जात निहाय जनगणना करण्यात यावी याची मागणी वारंवार करण्यात येत होती व त्याच्या आंदोलन सुद्धा झाले या निमित्ताने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न सुटणार असून मोठ्या प्रमाणात केंद्र शासन ओबीसींच्या विविध योजनांसाठी पैसा उपलब्ध करून देईल .योग्य प्रकारे आरक्षणात सुद्धा लाभ मिळणार आहे.
No comments