मुंबई महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राला नवे राज्यपाल रमेश बैस मिळाले ...
मुंबई
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राला नवे राज्यपाल रमेश बैस मिळाले आहेत. त्यामुळे छत्तीसगड येथील कृषी तज्ञ तथा या अगोदर राज्यपाल पदाची धुरा सांभाळणाऱ्या या विद्वत असणाऱ्या राज्यपालांना आता महाराष्ट्र सार्वजनिक रित्या समजून आलेला आहे. या अगोदर असणाऱ्या राज्यपालांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिली असून महापुरुषांच्या बद्दल वारंवार टिपण्या करणे आणि त्यावरती भाष्य करणे याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित रित्या राष्ट्रपतींकडे राज्यपालांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी केली होती. त्यामुळे काल मुंबई दौऱ्यावर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केल्यानंतर लगेच आज महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती होणे हा एक मोठा प्रसंग महाराष्ट्राला पाहायला मिळाला.
महाराष्ट्राची घाण निघून गेली अशा प्रकारची प्रतिक्रिया दैनिक पब्लिक पोस्टशी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. खरंतर या अगोदर महापुरुषांचा वारंवार अपमान करून भगतसिंग कोषारी यांनी महाराष्ट्राच्या अपमान केला, व मराठी माणसाला वारंवार दिवस याचा प्रयत्न केला त्यामुळे ही घाण निघून गेली. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. विशेष करून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच संविधानिक पदाच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर उतरली होती. हे खरे असताना उशिरा का असेना परंतु शहाणपण सुचले हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची परंपरा महापुरुषांचा सन्मान राखणारी असून येणाऱ्या काळात ही गोष्ट सर्वात महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे नव्या राज्यपालांचे मनापासून आम्ही स्वागत सुद्धा करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
No comments