Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

जातनिहाय जनगणना ,वक्फ वाचवण्यासाठी बैठक संपन्न

यवतमाळ  जागतिक शांतीचे प्रणेते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या अनुषंगाने देवांगन लॉन यवतमाळ या ठिकाणी लोकतांत्रिक राष्ट...

यवतमाळ 
जागतिक शांतीचे प्रणेते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या अनुषंगाने देवांगन लॉन यवतमाळ या ठिकाणी लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण प्रक्रिया अंतर्गत बैठकीच्या आयोजन करण्यात आली. सदर बैठकीमध्ये मुख्य आयोजक गोविंद चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी निवडण्याकरता कशा पद्धतीने लोक जागृती केली पाहिजे याची भूमिका प्रथमता समजावून सांगितली. 
त्यानंतर केंद्र सरकारने केलेल्या जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सर्वांनी केले परंतु सदर निर्णयासोबतच कुठल्याही प्रकारच्या बजेटची तरतूद केली नाही व तारीख जाहीर केली नाही. याबाबत शंका सुद्धा व्यक्त केली. जनगणनेच्या कॉलम मध्ये आदिवासी धर्म हा स्वतंत्र कॉलम असावा याची मागणी भारतातले तमाम राज्यातल्या आदिवासी बांधव करत आहे ही माहिती एम के कोडापे यांनी दिली. ओबीसी आंदोलन जनगणनेच्या संदर्भामध्ये आणि वक्फ वाचवण्यासाठी   यवतमाळ जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करून जनतेला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणे महत्त्वाचे आहे .अशी भूमिका महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाचे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी याप्रसंगी मांडली .सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसीच्या 38 हजार जागा या जैसे थे ठेवण्यात आल्या ,त्याकरता समाज जागृती करावी आणि जातनिहाय जनगणनेच आंदोलन गतिमान करावे ही भूमिका डॉक्टर विलास काळे यांनी मांडली ,याप्रसंगी सुनीता काळे यांनी संघटनात्मक बाजू आणि जनतेपर्यंत आपण पोहोचून सामाजिक परिवर्तनाचा गाडा पुढे न्यावा ही भूमिका मांडली , एडवोकेट इमरान देशमुख यांनी वक्फ बिल ही भारतीय संविधानाची चौकट कशा पद्धतीने नष्ट करते, आणि सामान्य माणसाच्या न्यायपूर्ण निर्णयाच्या विरोधामध्ये हे बिल आणून हे अन्यायपूर्ण बिल आहे, याच्यामध्ये ज्या तरतुदी केल्या आहे त्या तरतुदी भारतीय संविधानातील मानवी मूल्यांचे उल्लंघन करत आहे ,आणि हे उल्लंघन आपण खपून घेणार नाही, वक्फ वाचविण्याकरता  सर्वांनी जागृत होऊन एकमताने सदर बिलाचा विरोध करावा ,याकरता तमाम बहुजन समाजाच्या जागृतीची गरज आहे अशी भूमिका याप्रसंगी मांडली.तत्पूर्वी उपस्थित सर्वांनी तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्री आई फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले ,तसेच भारतीय सैनिकांचे सुद्धा आभार मानले .या बैठकीमध्ये दीपक ठाकरे, राजू कापसे, दिलीप बोरगमवार,एम के कोडापे ,आर के चव्हाण , माया गोबरे ,प्राध्यापक पी एस कान्हेकर, डि के भगत, जियाउद्दीन ,काजी निजामुद्दीन, साजिद खान, मोहम्मद मुस्कान गौरी ,एडवोकेट इमरान देशमुख यांनी आपले विचार मांडले.

No comments