Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

आव्हानांचा "शिवधनुष्य" जननायक नामदार संजय राठोड

राजेश खोडके  पब्लिक पोस्ट  वैदर्भीय मातीतील इवलशा रोपट्याने शिवसेनेच्या भगव्या पालवीला वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प करीत, स...

राजेश खोडके 
पब्लिक पोस्ट 
वैदर्भीय मातीतील इवलशा रोपट्याने शिवसेनेच्या भगव्या पालवीला वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प करीत, सुरू केलेली वाटचाल सध्या बहुचर्चित आहे. या व्यक्तिमत्त्वाबद्दल राज्यातील प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल दडले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण इथपासून तर महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेच्या असलेल्या विविध समस्यांना पोटाशी धरण्याचे महत्तम कार्य विद्यमान मृद व जलसंधारण मंत्री मा.ना. संजय राठोड यांनी केलं. जरी लाल दिव्याची गाडी भेटली तरी पाय जमिनीवर ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या सामाजिक सेवेचा वसा मात्र कायम ठेवला. समाजकारणातील जनतेशी जुडलेली कास त्यांची आजही तेवढीच स्फूर्तीदायक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नामदार संजय राठोड यांचे नाव तेव्हाच गाजायला लागलं, जेव्हा दारव्हा मतदार संघातून तत्कालीन गृहराज्यमंत्री यांचा पराभव करून विधानसभेत पहिलं पाऊल ठेवलं. पहिला विजयाचा "गुलाल"घेऊन जेव्हा संजय राठोड मातोश्रीवर पोहोचले, तेव्हा शिवसेनाप्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी शाबासकीची थाप पाठीवर दिली. एक आक्रमक नेता म्हणून त्यांचा परिचय झाला. एकीकडे काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता असतांनाही शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन एकाकी झुंज देत सेनेची खिंड लढत त्यांनी कसब हस्तगत केले. जनसामान्य माणसांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारलं ते आजही कायम आहे. महाराष्ट्राच्या धुरंदर राजकारणी प्रक्रियेमध्ये या धडपडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं कार्य डोळ्यात भरणारं असल्याने राजकारणातील सारीपाट हलला असला तरी "सेवा ही सेवाच असते"हा अभिनव उपक्रम उराशी घेऊन वाटचाल करणाऱ्या या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याची आजही मातीशी नाळ जुळलेली आहे. 
       महाराष्ट्राच्या इतिहासाला राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. तोच आदर्श समोर ठेवून स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या हरितक्रांतीची मशाल खांद्यावर घेत वाटचाल सुरू केली. वास्तविकत: वैदर्भीय मातीत शिवसेनेचा झेंडा फडकावा अशी इच्छाही बाळासाहेबांनी बरेचदा व्यक्त केली. यवतमाळच्या कला वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉम. ची पदवी घेतल्यानंतर सुभेदार रामजी आंबेडकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय हिंगणघाट जि. वर्धा या ठिकाणाहून बी.पी.एड ची डिग्री संपादन केली आणि तरुण वयातच शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर सर्वात प्रथम जनाबाई नावाच्या आदिवासी भागातील महिलेची शस्त्रक्रिया केल्यानंतरचं मिळालेलं समाधान लाखमोलाचं होतं. विशेष म्हणजे बाळासाहेबांचे असणारे वैद्यकीय सेवेचे स्वप्न साकार करण्याची पहिली संधी जननायक विद्यमान नामदार संजय राठोड यांना मिळाली. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचं खरं सूत्र यावेळी गवसलं. घरातील सर्व सभासदांना "वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा आहे" या सेवा प्रकल्पाचा मतितार्थ समजून देत ही सेवा यवतमाळातील शासकीय रुग्णालयाच्या आवारात मातोश्री प्रतीक्षालयाच्या माध्यमातून यवतमाळात आजही निरंतर सुरू आहे. म्हणूनच विद्यमान नामदार संजय राठोड हे दिग्रस-दारव्हा-नेर मतदार संघच नव्हे तर सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.
       राजकारणातील मुसंडी 
 महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात विदर्भातील शिवसेनेचा एकमेव आमदार म्हणून त्यांचा परिचय मातोश्रीला होताच. असे असतानाही कोणताही राजकीय वारसा नसतांना फक्त कार्य करा असा नारा सातत्याने राहिला. राजकीय क्षेत्रात निर्माण झालेल्या हालचाली बघता तत्कालीन भाजप-सेना सरकारच्या काळात राज्यमंत्री पदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर शिवसेनेच्या पद्धतीने प्रशासकीय कार्य करण्याचा सपाटा त्यांचा वाखाण्याजोगा होताचं.
  उभ्या महाराष्ट्राला सेवाव्रत मंत्री म्हणून परिचय देण्याचा बहुमान ही त्यांनी मिळवला. दिग्रस- दारव्हा- नेर मतदार संघातील प्रश्नांची जाण लक्षात घेता विदर्भाच्या विविध प्रश्नांवरती एकाकी झुंज देण्याचा प्रसंग विधानसभेच्या पटलावर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारणाला धक्का देत व प्रस्थापितांची नाडी ओळखत केलेले उपचार हे उत्तम उदाहरण आहे. सामाजिक सेवा व सातत्याने असलेला जनसंपर्क हा दिवसेंदिवस वाढतच राहिला. तत्कालीन भाजप-सेनेची युती तुटल्याने परत दिग्रस मतदार संघातून शिवसेनेने स्वबळावर लढलेली निवडणूक जिंकत परत विधिमंडळात प्रवेश केला आणि चौथ्यांदा विजय संपादन केल्याने महाराष्ट्राच्या तत्कालीन कॅबिनेट मध्ये वर्णी लावली. राजकीय दृष्टीने डावपेच नसलेले व सेवा व्रत स्वीकारत राजकीय वलय निर्माण करीत आजही "आक्रमक तोरा आणि शिवसेनेचा पोरा " ही वाटचाल सुरूच आहे. 
 आव्हानांचा शिवधनुष्य पेलणारच...!
१९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या सूत्रासहित शिवसेनेची स्थापना केली. ५८ वर्षाच्या वाटचालीमध्ये शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिलेत. जय-पराजय, बंड, नाराजी, आंदोलने, तुरुंगवाऱ्या, कौतुक ते सारं काही शिवसेनेने अनुभवलं आहे. आयुष्याची राजकीय कारकीर्द सुरू करत आलेले गोड- कडू अनुभव हे माझ्या दृष्टीने राजकारण प्रगल्भ करणारे आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला न जुमानता वाटचाल सुरूच राहील. शेवटी राजकारण आहे. या राजकारणाला तोड देणे आणि येणाऱ्या समस्यांवर तुटून पडण्याचे कसब त्यांनी आजही आपल्या मनगटात ठेवले आहे. राजकीय कुस्तीगिरांच्या फडात नामदार संजय राठोड यशस्वीपणे एकापाठोपाठ एक डाव जिंकत आहेत. एका निष्ठावंत शिवसैनिकांच्या दिलेल्या आशीर्वादाचं हे फळ आहे. राज्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या विविध बदलात नामदार संजय राठोड यांची भूमिका सर्वात महत्त्वाची राहणार आहे. ती पुढील काळात नक्कीच पाहायला मिळणार आहे. सध्याच्या राजकारणात विविध प्रकारची आव्हाने पेलत शिवसेनेला तळागाळातील पक्ष म्हणून असलेली ओळख आणि त्यांनी केलेली कार्यशैली आजही विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे हा शिवसेनेचा "शिवधनुष्य" पेलताना राजकीय लढ्यासाठी कष्टकरी, शेतकरी, तरुण व विविध स्तरात काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन ही नौका पार करण्याचं कसब शिवसेनेच्या या आमदारांमध्ये आहे. जो आमदार विदर्भाला एक नवी दिशा देऊ शकतो. कारण पक्ष जर मोठा करायचा असेल तर तळागाळाच्या सोबत काम करावे लागते. त्यामुळे महाराष्ट्राच्या नेतृत्वाने दिलेल्या विश्वासाला पूर्णत्व आणण्यासाठी शिवसेना बळकट करून भगवे साम्राज्य निर्माण करण्यासाठी "शिवधनुष्य" पेलने ही एकच खात्री यावेळी दिसून येत आहे. 
  वोट बँक पावर नेता...
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस बदल होत चालले आहे. विशेष म्हणजे पांढरपेशी पुढारी समोर येऊन "मासलेस" लीडर ची निर्मिती दिवसेंदिवस होत आहे. त्यामुळे वैदर्भीय मातीतील राजकीय "बळ आणि बल" बघता कुणाच्या मागे जनता आहे हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे सर्वसामान्य बांधवांसोबत असणारा कार्यकर्ता आमदार संजय राठोड परिचित आहेत. दिग्रस- दारव्हा- नेर मतदार संघापासून तर विदर्भातील सर्व स्तरात असणाऱ्या शिवसैनिकांची आस्था मात्र आजही त्यांच्या सोबत आहे. मराठवाड्यामध्ये गेल्यानंतरही हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये बिनधास्तपणे प्रवेश घ्यायला तयार आहेत. हा शिवसेनेचा भगवा सातत्याने महाराष्ट्रामध्ये फडकत राहावा याकरिता प्रयत्न करणाऱ्या या तळागाळातील कार्यकर्त्याचे आज मात्र कमालीचे नियोजनबद्ध काम आहे. वैद्यकीय सेवा विविध प्रकारचे नियोजन विकासात्मक दृष्टिकोनातून केलेले कार्य ज्या हातांना कधी काम मिळाले नाही त्या गुजरात राज्यांमधील सुरत येथून मुलांना मतदारसंघांमध्ये आणून हिऱ्यांचा कारखाना निर्माण करीत एक वेगळं पाऊल भाऊंनी टाकलं आहे. राजकीय दृष्टिकोनातून अनेक बाबतींमध्ये टीका होत असतील यात दुमत नाही. कारण जोपर्यंत विरोधक बोलत नाही तोपर्यंत सत्तेला धार येत नाही. ती धार जर निर्माण करायची असेल तर टीका झालीच पाहिजे. हे सूत्रही तेवढेचं मनाशी त्यांनी जोपासल आहे. आणि म्हणून सर्व समाज बांधवांना एकत्रित करून पक्षाची मोट बांधत केलेली वाटचाल ही डोळ्यात भरणारी आहे. यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भाच्या अनेक ठिकाणी विखुरलेला भटका विमुक्त समाज बांधव हा राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नव्हता अशा वेळी स्वर्गीय वसंतराव नाईकांनी राजकीय क्षेत्रामध्ये विशेषता बंजारा समाजाची ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली. त्यानंतर हळूहळू या समाजामध्ये नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला. आणि मग सत्तेच्या सरीपाटामध्ये आमदार संजय राठोड नावाच्या युवकाचा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम एकट्या समुदायाला सोबत घेण्यापेक्षा सर्व समाजघटकाला सोबत घेऊन राजकीय समीकरण यशस्वी करून दाखविले. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा-नेर मतदार संघामध्ये पाच वेळा आमदार म्हणून निवडणूक लढवून व विजय संपादन करून हे कसब पूर्ण करत असतांना राज्याच्या राजकीय धुरंधरांची मात्र गोची झाली. अनेकदा पराभव करण्याचे षडयंत्र सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आखले गेले. परंतु शेवटी निष्ठावान आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी जुळलेली आमदार संजय राठोड यांची नाळ मात्र तुटली नाही. राज्याच्या राजकारणामध्ये वोट बँक नेता म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते. येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्याकडे वोट बँक असेल त्याच नेत्यांची राजकारणामध्ये चालती राहील हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला याबाबतची कल्पना सुद्धा आहे. सध्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये आता विद्यमान नामदार संजय राठोड यांचे प्राबल्य किती महत्त्वपूर्ण आहे हे येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील होणारा राजकीय अमुलाग्र बदल आणि विदर्भातील होणाऱ्या पुढील निवडणुका यामध्ये महत्त्वाची भूमिका सुद्धा त्यांची राहणार आहे.

No comments